Wednesday, February 15, 2017

महाराष्ट्रातील सर्व पक्षांना रुळावर आणणारा एक प्रामाणिक मराठी नेता



मी मिलिंद पालांडे हे लिहितोय ते फक्त आणि फक्त एक सर्व साधारण मतदार नागरिक म्हणून. एक मतदार नागरिक म्हणून मला काय वाटतंय ते मी येथे मांडतोय. मी जे मांडतोय ते कदाचित तुम्ही पण हे अनुभवलं देखील असेल...
महाराष्ट्रातील काही पक्षांना एके काळी असा गैरसमज झाला होता की आपल्या वाचून मुंबई महाराष्ट्रातील नागरिकांचे काही भलं होणार नाही आणि जातील तर जातीले कुठे ? फार फार तर थोडे दिवस आपल्या नावाने बडबडत आणि गप्प बसतील.

पुन्हा निवडणूक आली की येतील आपलेच पाय चाटायला. त्यातूनच जर एखाद्याने आवाज उठवलाच कि त्याला साम दाम दंड भेद वापरून गार करायच म्हणजे झालं काम त्यांचं.
वर्षानुवर्षे हाच नागरिक मूग गिळून गप्प राहायचा, अन्याय सहन करायचा आणि पुन्हा निवडणूक आली की मतदार नेहमी प्रमाणेच म्हणायचे आपलाच माणूस आहे रे जाऊ दे दुसऱ्या कुणाला मत देण्यापेक्षा मराठी आहे ना म्हणून मतदान करायचा..
अहो पण त्या नागरिकाला मिळालं काय?? विकास का?
विकास?? तो तर मतदारांच्याया कित्येक पिढ्यांनी बघितला नाही पण सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या तिजोऱ्या मात्र अगदी ठासून भरल्या..
पण आज परिस्थिती बदलली आहे.. ती कुणामुळे?? ते ही समजून घ्या..
वर्ष २००६ एका तरुण तडफदार मराठी नेत्याने स्वतःचा हक्काच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून मनात ठाम आत्मविश्वास आणि मूठभर सहकारी बरोबर घेऊन स्वतःचा नवीन पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढला आणि ते म्हणजेच तुमचे आमचे मराठी हृदय सम्राट माननीय राज साहेब ठाकरे..
एवढी वर्षे सतत अन्याय सहन करणारा,जागो जागी नोकरीसाठी परप्रांतीयांमुळे लाथा खाणारा, आपल्याच घरात परका,लाचार झालेला मराठी माणूस आणि त्याचा मराठी बाणा आज जागृत झाला तो फक्त राज साहेब तुमच्याच मुळे जणू काही एखाद्या निष्प्राण शरीरात प्राण यावेत अगदी तसेच...
ह्या आधी कोण विचारत होत हो मराठी माणसाला? आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना? पण साहेब तुम्ही पाठीशी उभे राहिलात ह्या मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या आणि सांगितलंत की "अन्याय दिसेल तिथे लाथ मारा आदेशाची वाट पाहू नका" आणि काय चमत्कार! त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हा आम्हाला आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात पाहायला मिळतायत..
अहो इथे माजलेल्या सत्ता धारी सोडा पण साध्या नगर सेवकालाही प्रश्न विचारायला ही लोक घाबरत होते. पण साहेब जेंव्हा पासून तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केलात अगदी त्याच दिवसा पासून त्रासलेल्या समस्त मराठी जनांना मराठीचा वाली मिळाला. माजलेल्या सत्ता धाऱ्यांना त्यांचा माज उताराविण्यास मराठी माणसा सकट इतर नागरिकांनाही वाव मिळाला.. आज कुठल्या हि पक्षाचा उमेदवार जरी दारात आला तरी लोक त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतात कि आमच्यासाठी इतकी वर्षे काय केलात ते आधी दाखवा? आणि मग मतांचे बोला..
आज जी विकासाची चढाओढ लागलीय ती फक्त राज साहेब तुमच्यामुळेच.
स्वतः सत्तेत असून विकास का नाही झाला? ह्याची जबाबदारी तर सोडा पण त्याची खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडणाऱ्या मुजोर राजकीय पक्षांना विकासावर खोटं का होईना! पण बोलायला राज साहेब आपण भाग पाडलेत.
जो तो दारात येतोय मराठी अस्मिता घेऊन, विकासाची गाजर घेऊन तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा घेऊन, टीव्ही, युट्युब ,फेसबुक व्हाट्सअपवर जाहिराती दाखवून.

पण मला ह्या महामूर्खांना एकचं प्रश्न विचारायचा आहे की अरे ठोंब्यांनो तुम्हीच होतात ना सत्तेत? दिली होती ना एवढी वर्षे? मग इतकी वर्षे केलात काय? होतात कुठे? गाजारांची शेती करत होतात का? की गाजर पुढे दाखवण्यासाठी उपयोगी पडतील म्हणून गाजरं उपटत होतात?
असो ही मंडळी काय सुधारणार नाहीत. सुधारायला मतदारांना म्हणजेच येथील नागरिकांनाच हवे. म्हणूनच मी माझ्या पासूनच सुरवात केलीय ती २००६ मध्ये. मनसेची आमच्या विभागात बांधणी करण्याचा माझा घेतलेला निर्णय यशस्वी ठरला मला माझा प्रामाणिक नेता भेटला. मी तर महाराष्ट्र सैनिक झालो.पण तुमचं काय??
राज साहेब खरंतर तुम्ही पक्ष स्थापनेला खूप उशीरच केलात.. जरा आधी केला असतात तर ह्या मुजोर लोकांना लवकर जाग तरी आली असती आणि जे वीज,पाणी,घर,आरोग्य अश्या सुखसुविधा न मिळालेल्यामुळे जे मराठी माणसांचे स्थलांतर झालेय ते तरी नसते झाले.. पण असो प्रत्येक गोष्टींची वेळ यावी लागते असे म्हणतात ना ते ही बरोबरच आहे..
माननीय राज साहेब आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला दाखविलात कि विकास म्हणजे काय? विकास पर्यावरणाची काळजी घेत कसा करायचा आणि पाणी,वीज,आरोग्य आणि घर ह्या मूलभूत सुविधा सोडून त्याही पलीकडे काही जग असत हे तुम्ही स्वतः नाशिक मध्ये अगदी नाशिकची महानगर पालिका कोट्यवधी रुपयांत कर्जबाजारी असूनसुद्धा ते कर्ज फेडून विकास कामे केलीत आणि तेही फक्त ५ वर्षांत ना भूतो ना भाविष्यतो करून दाखविलात...
आणि म्हणूनच इतर पक्षांना आता राजकारणात टिकायचे असेल तर विकास कामे करून दाखविले पाहिजे. नाही तर मतदार त्यांनीच दिलेल्या गाजरांचा उपयोग त्यांच्यावर कुठे आणि कसा करतील हे त्यांचं त्यांनाच सांगता येणार नाही हे त्यांना आज कळून चुकलंय...
जाता जाता फक्त एवढंच सांगतोय कि ह्या किंवा पुढील भविष्यात येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीचा निर्णय काहीही असो "विजय हा फक्त तुमचाच आहे राज साहेब फक्त तुमचाच" कारण जो कोणी सत्तेत येईल त्याला तुमच्या सारखी टिकाऊ कामे आणि नयनदीप कामे करून दाखवावी लागतील. जर तसे झाले नाही तर मनसे आहेच तयार... आता काम करा किंवा मरा म्हणजेच सत्ता सोडा हाच हिशोब..

आणि म्हणूनच "विजय हा फक्त आणि फक्त तुमचाच आहे राज साहेब फक्त तुमचाच" ..धन्यवाद...मनसे जय महाराष्ट्र...
                                     ©मिलिंद पालांडे©

4 comments: